श्री कृष्ण मंदीरा समोर असणारे हे "कळबाचे" झाड आहे. अनेक दुर्मिळ झाडापैकी हे कळबाचे झाड.या झाडापरती श्री. कृष्णाने अनेक खेळ खेळलेले आहेत. ही एक औषधी वनस्पती आहे. मे महिन्यात या झाडाला लागलेल्या फुलांपासुन सुगंध दरवळतो तसेच या वृक्षाचा उपयोग लग्नकार्यत मुहुर्तमेढ म्हणुन उपयोग होतो.
श्री. कृष्णाच्या पाऊल खुना
श्री. कृष्ण मंदिराच्या लगत ढोहाजवळ पाशाणदगडामध्ये
श्री. कृष्ण सवंगड्यासह क्रीडा करत आसताना त्यांच्या पायांचे ठसे या दगडामध्ये उठले आहेत. तरी या पाऊलखुनाची पुजा लोक मोठ्या भक्तिभावाने करत असतात.
गोकुळ शिरगांव मध्ये अनेक मंदिर अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक म्हणजे दत्त मंदिर, दररोज सकाळी. 6.15 वाजता व संध्याकाळी 7.15 वा. आरती असते. दर पौर्णीमेला संध्याकाळी भजन असते. दत्त जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम असतात व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हे मंदिर लोक वर्गणीतुन बांधलेले आहे.
गणपती मंदिर हे मंदिर लोक वर्गणीतुन बांधले गेले असुन या मंदिरात दररोज सकाळी. 6.30 वा. आरती केली जाते. गांवातील सर्व लोकंचे श्रद्धास्थान आहे. दर महिण्याच्या संकष्टीला तिथे प्रसाद केला जातो.
" श्री. कृष्ण मंदिर" हे मौजे गोकुळ शिरगांव येथे आहे. हे मंदिर खुप प्राचिन व पुरातन मंदिर आहे. ह्या मंदिराच्या मागच्या बाजुला धबधबा आहे. तो
पावसाळ्यामध्ये ओसांडुन वाहतो. धबधब्याच्या वरच्या बाजुला बाळ श्री. कृष्णाच्या पाऊलखुणा दगडांमध्ये दिसतात. त्यामुळे श्री. कृष्ण ज्न्माष्टमीला भावीकांची फ़ार मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशा या श्री. कृष्ण मंदिरमुळे व बाळ श्री. कृष्णाच्या पाऊलखुणांमुळे या गांवाला गोकुळ शिरगांव हे नाव प्राप्त झाले. दर्श आमावस्येला या गांवची यात्रा असते. त्यामुळे भावीकांची दर्शनासाठी फ़ार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
"म्हसोबा मंदिर " हे "नवरात्र" साठी गांवक-यांनी बांधले आहे. दस-याला या मंदिरामध्ये महिलांची फ़ार मोठ्या प्रमाणात गर्दी असते. म्हसोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. म्हसोबा मंदिराच्या परिसरात वडाचे फ़ार मोठे झाड आहे. "वटपौर्णिमा" या सणाला महिला या वडाची पुजा करतात. या देवाची तीन वर्षातुन एकदा जत्रा करावी लागते त्याला "म्हसोबाची यात्रा" असे म्हणतात. तसे हे देवस्थान खुप कडक व जागृत देवस्थान आहे.
"राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – 4" आसून देशांतील तो एक दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग बेंगलोर- पुणे मार्गे मुंबई अशा मोठ्या शहरांना जोडणारा देशातील एक अत्यंत महत्वाचा मार्ग समजला जातो. हा महामार्ग देशांतील अनेक मोठ्या शहरांना जोडतो. हा महामार्ग मौजे गोकुळ शिरगांव या गांवातून गेलेला आहे.
